Friday, August 17, 2012

सरकारच्या डोळ्यावर झापड आले आहे का?




दंगलीच्या भितीने जीवाच्या आकांताने हजारो नार्थ-ईस्ट मधील बांधव आपल्या घरी परतत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना,बांग्लादेशी गुप्तहेर संघटना ,जिहादी संघटना यांनी आखलेल्या कटास यश येण्याची भीती आहे.पध्दतशीरपणे सोशल मिडियाचा वापर करून दंगली भडकविण्याचे कारस्थान रचले गेले.सरकारला दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णत: अपयश आले आहे.

आज आसाम हे गेटवे ऑफ बांग्लादेश बनले आहे.स्थानिक आसामी नागरिकांना लक्ष करून बांग्लादेशी घुसखोरांनी आपले प्रस्थान थाटले आहे.मताच्या लाचारीमुळे सरकार काहीच करत नाहीत.पुर्वेकडील राज्यामध्ये आज आपल्याच देशाविषयी असंतोष वाढत आहे.हजारो लोक जर परत पूर्वेकडे गेले तर परत एकदा असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे.  

चिकन नेक नावाने ओळखला जाणारा 24 किमी लांबीचा भूभाग जो भारतास नार्थ-ईस्टकडील राज्यांस जोडतो तो तोडून नवीन देश वसवायचे कारस्थान काही वर्षापासून रचले जात आहे.या भागात बांग्लादेशी घुसखोरांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.

दररोज सहा हजाराहून अधिक बांग्लादेशी अवैध मार्गाने भारतात प्रवेश करतात.मतासाठी राजकीय दलाल त्यांना ओळखपत्रे,रेशनकार्ड ,निवासी दाखला देण्यास तत्पर असतात.स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी या राजकीय लोकांना निर्वासितांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात कारण उद्याची ती त्यांची मतपेढी असते.

सरकारने या निर्वासितांचा बंदोबस्त करून स्थानिकाकडे लक्ष दिले पाहिजे.नाहीतर उद्या भारताची आणखी छकले पडण्याची शक्यता आहे.

सरकार आतातरी आपल्या डोळ्याची झापड उघडेल का ? 
    

  

1 comment:

  1. खराय.सरकारचे डोकेच ठिकाणावर नाही.

    ReplyDelete