आजकाल भारतात काही गल्लाभिरू चित्रपट निर्मात्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचे धिंडवडे चालविले आहे, त्याला सेन्सार बोर्डात बसविलेले ठोकळेसुध्दा जबाबदार आहेत.
मुळात सेन्सार बोर्डाच्या सदस्यांनी हे पद फक्त मिरविण्याचे साधन बनविले आहे.जिस्म,राज,मर्डर सारख्या चित्रपटांतील अश्लिल दृश्यांना परवानगी देऊन हे सदस्य भारतीय संस्कृतीची चिरफाड करत आहेत आणि काही गल्लाभिरू निर्मातेही याला तितकेच जबाबदार आहेत.सर्वप्रथम सेन्सार बोर्डाच्या ठोकळ्यांची बोर्डातून हकालपट्टी केली पाहिजे.
आज भारतीय मिडियासुध्दा सनी लियोन या जिस्म चित्रपटाच्या तारकेचा उदोउदो करून तिच्या मुलाखती घेत आहेत हे पाहून भारतातील मिडियाने खालची पातळी गाठली आहे असे वाटू लागले आहे.
एका बाजूला लोकांना भारतीय संस्कृतीचे धडे द्यावयाचे तर दुसऱ्या बाजूला अनैतिक गोष्टींना महत्व द्यावयाचे यावरून भारतीय मिडियाचा दुटप्पीपणा उघडा पडला आहे.
मुळात भारतीय मिडियाला नैतिकता उरली आहे तरी कुठे ?
No comments:
Post a Comment