Saturday, January 19, 2013

भारत सरकार चर्चा पुरे करा आता ,प्रत्यक्ष कृती करा


पाकिस्तानने कितीही आगळीक केली तरी आपले भारत सरकार डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून गप्प का राहते हेच समजत नाही.

आपल्या देशाचे दुर्दैव हे आहे की सरदार पटेलसारखे कणखर गृहमंत्री या देशाला परत लाभले नाहीत.प्रधानमंत्री पदाबदल तर काहीच बोलायला नको एक-दोन अपवाद वगळता प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे प्रधानमंत्री या देशाला परत लाभले नाहीत

देशात नक्षलवाद फोफावत चालला आहे,जो सीमेवरील शत्रुपेक्षा अधिक धोकादायक झाला आहे.या प्रश्नाकडे सरकार किती गांर्भियाने पहाते हेच कळत नाही.दिल्लीत राहून नक्षलीविरूध्द गप्पा मारायच्या  मंत्र्यांना आता तोंडवळीनी पडले आहे.एलटीटीई सारख्या जगातील सर्वात धोकादायक संघटनेचा मुकाबला श्रीलंका सारख्या छोट्या राष्ट्राने केला.शेजारील शत्रूराष्ट्रे चीन,पाकिस्तान या नक्षलींना खुलेआम हत्यारांचा पुरवठा करतात.या नक्षलीविषयी सरकार बोटचेपी धोरण का राबवत आहे हेच आता कळण्यापलीकडे गेले आहे.  

कारगिल युध्दादरम्यान पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला भारतीय अधिकारी लेफ्टनंट सौरभ कालिया आणि त्याच्या साथीदारांना ठार मारून, त्यांच्या मृतदेहांची विटंबना पाकिस्तानी सैनिकांनी वाईट रीतीने केली होती.तोच प्रकार परवा पाकिस्तानी सेनेने केला.आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करून पाकिस्तानी सैनिंकानी दोन भारतीय सैनिकांना मारून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली.

एवढा भयंकर प्रकार परत-परत घडत असताना आपले सरकार पाकिस्तानला नुसतेच इशारे देते आहे. पाकिस्तानाबरोबर देशातील नक्षलींना अंतिम धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना परत-परत इशारे देऊन काय उपयोग होणार आहे ?  

आता चर्चेचे गुऱ्हाळ पुरे करा आणि प्रत्यक्ष कृती करा.'अमन की आशा’ म्हणून क्रिकेट खेलण्यासारखे बालीश निर्णय परत घेऊ नका म्हणजे झाले.

No comments:

Post a Comment