देशातील सर्वाधिक आत्महत्या आज महाराष्ट्रात होतात,हे आपल्यासाठी खूपच लाजीरवाणे आहे.गडचिरोली,मेळघाट सारख्या ठिकाणी कुपोषणाच्या समस्या आहेत,त्यातच नक्षलवादाची भर आहे.विदर्भात तर कायमच दुष्काळी परिस्थिती असते.महाराष्ट्राची प्रगती नक्की कशाच आहे हेच कळत नाही.
आज महाराष्ट्रात सर्वात जास्त पैसा जलसिंचनाच्या योजनेसाठी खर्च होतो.काही योजना तर दोन-तीन दशके चालू आहेत.काही कोटीचा खर्च हजारो कोटीवर जातो.यामधील फायदा कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांत विभागला जातो.सदोष योजनेमुळे धरणातून होणाऱ्या पाणी गळतीचे प्रमाण तर खूपच लक्षणीय आहे.
धरण परिसरात टुमदार बंगले बांधून राहणाऱ्या अधिकारी,राजकारणी लोकांना सर्वसामान्य जनतेचे अश्रू दिसत नाहीत.धरणे जनतेसाठी नव्हे तर कंत्राटदार,सरकारी अधिकारी तसेच राजकारणी लोकांसाठी बांधली जातात असे आता खरोखरच वाटू लागले आहे.
नदीजोड योजना राबवून दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य आहे.पण जनतेचा पैसा पाण्यात वाहून गेला तरी सरकारला अजून जाग आलेली नाही.
No comments:
Post a Comment