Thursday, September 13, 2012

गुटखाबंदीचा महाराष्ट्र शासनाचा स्वागतार्ह निर्णय


महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला याबद्दल सर्वप्रथम शासनाचे आभार.या पदार्थामधील निकोटीन या घटकामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजार होतो.आजच्या तरूण पिढीमध्ये हे पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच आहे.

कॅन्सरसारख्या आजारामुळे आई-वडिलांना आपल्या तरूण मुलाला गमाविण्याची वेळ येते.ज्या वयात आई-वडिलांना आधार देणे गरजेचे आहे त्याच वयात मुलासाठी आक्रोश करण्याची वेळ पालकांवर येते यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते ?

गुटखा आणि पानमसाल्यावर  बंदी आणल्यामुळे गुटखा उत्पादकांनी मावा,सुपारीमिश्रीत गुटखा असे पदार्थ बाजारात आणले आहेत.या सर्वच पदार्थावर बंदी आणणे गरजेचे आहे,तसेच परराज्यातून गुटखा आणून महाराष्ट्रात काळ्या बाजारात विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे,तरच बंदीचा फायदा होईल,नाहीतर व्यापारी लोकांना काळ्याबाजारात असे पदार्थ विकून बक्कळ पैसा कमाविण्याचे आणखी एक साधन मिळेल.       

No comments:

Post a Comment