Thursday, November 3, 2011

टीम अण्णांचे भरकटत चाललेले आंदोलन

भष्ट्राचार विरूध्दच्या अण्णांच्या आंदोलनात सारा देश स्वंयस्फुर्तीने एकत्र आला.स्वातंत्र्यलढ्यानंतर सर्वाधिक लोकांनी भाग घेतलेले हे मोठे जनआंदोलन होते.

या आंदोलनाला मिळालेल्या यशाने या टीममधील इतर लोक सध्या भरकटून गेले आहे.किरण बेदी,केजरीवाल,प्रशांत भूषण ही मंडळी त्यापैकीच एक होत.

या प्रत्येक मंडळीच्या सामाजिक संस्था(N.G.O.)आहेत.या मंडळीच्या एकंदरीत वर्तनावरून आपल्या संस्थेला या आंदालनाचा किती फायदा होईल यावर ही मंडळी सध्या लक्ष देत आहेत.सोशल मिडियामध्ये वेगवेगळी वक्तव्ये करून या मंडळीनी आंदोलनाची धार बोथट करून टाकली आहे.

टीम अण्णांमधील या मंडळीना आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा केली नाही तर भष्ट्राचारविरूध्दच्या जनआंदोलनाची स्थिती समुद्राच्या वादळात भरकटलेल्या जहाजासारखी होण्यास वेळ लागणार नाही.    

No comments:

Post a Comment